डोळ्यांत आलेपाणी....

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले...... 'ए आपण असे कसे रे ना रंग, नारूप, नेहमीच चिडीचुप, आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर, दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर, कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला, किनारा ही नाही साधा या पापण्याला............ दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला, खुप विचार करून तो बोलला, रंग-रूप नसलातरी, चिडीचुप असलो जरी, आधार आपण भावनांचा, आदर राखतो वचनांचा, सान्त्वनांचे बोल आपण, अंतरीहीखोल आपण, सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे, दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व, आपल्याला नाही कोणीथांबवु शकत, बंधनात नाही कोणी बंधवु शकत, उद्रेक आपण मनातील वेदनांचा, नाजुक धागा वचनातील बंधनांचा, भावबंध ह्रदयातील रुदनांचा, स्वरबद्धझंकार तनातील स्पन्दनांचा, म्हणुनच, आपले बाहेर पड़णे भाग आहे, आपल्यामुळेच आज हे जग आहे. अशीच आपली कहाणी......... ऐकून ही अश्रुचीवाणी अश्रुच्याच डोळ्यांत आलेपाणी....

Previous Post Next Post