विसरणं शक्य नसलं तरी

विसरणं शक्य नसलं तरी,
आठवण तुझी काढणार नाही.
भारावून जरी गेलो तरी,
नयनी आसवं दाटणार नाही.

...छळलंस किती तू मला तरी,
सवे तुज कोणी भांडणार नाही.
डोळ्यात उभे पाणी जरी,
थेंब एकही सांडणार नाही.

आग दु:खाची कोणत्याही,
अश्रूंच्या पाण्यानं विझत नाही.
तरीही दोन अश्रू पाझरल्याशि वाय,
मन मात्र हलकं होत नाही.
Previous Post Next Post