ती जिंकायची

फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कङून आधाराची ?
जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची?
किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ?
कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ?
अशीच लढाई आहे हो आपल्या एका जीवनाची,
फक्त एकट्यानेच लढुन आहे ती जिंकायची..!
Previous Post Next Post