शेवटी आठवणीच राहतात .

ओल्या मिठीतून तू माझ्या कधी कोरड्याने नको जाऊस ..
भिजवीन मी तुला इतके सये की जळून जाईल हा पाऊस

आठवणीत तुझ्या मी जगीन आठवणीने तुझ्या मी राहीन
ह्रुदयाचा ठेक्यात हि सये शेवटी तुलाच जपून ठेवीन

दर उन्हाळ्या पावसाळ्यात असाच मी निरंतर वाट पाहीन
येणार नाही माहित असून पण फक्त आठवणीतच चिंब होयीन

कितीही निखळ मानाने प्रेम केलं तरी अनेक विचार तुला भेडसावत राहतात
अविश्वासानेच सोडून गेलीस आता तर आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
.
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात ,आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात ....... ♥♥♥
Previous Post Next Post