आयुष्य जगतांना

आयुष्य जगतांना असाही वागावं लागतं...
मन कडू आसतान्ना गोड़ बोलावं लागतं..
जगण्याचे सारेच प्रयत्न फोल ठरत जातात..
खपल्या काढल्या की जखमां कश्या खोल-खोल जातात..

माणसं जी आपली वाटतात..
ती आपली नसतातच मुळी..
तरीही एकमेकांत गुंतत जातात..
मनं आपली खुळी...

त्या दिवशी तर माझाच मरण
मलाच कसं टालुन गेलं..
चार घटका जीवाशी खेलून
तेहि मला सोडून गेलं....

जीव जात असला
तरी हसावे लागते
आयुष्य जगताना
असे वागावेच लागते...
Previous Post Next Post