काय काय बोलायचं.

तुझ्याशी काय काय बोलायचं, हे आधीच मनाशी ठरवून येते...

पण तू समोर आल्यावर मात्र, सारं काही एका क्षणात विसरून जाते !

मनात साठवलेले शब्द, तुला पाहिल्यावर मनातच राहतात...

मनातील भाव मग हळूच, डोळ्यांमध्ये उतरतात !

सुरू होते मग नजरेची भाषा, जी कळते फक्त तुला नि मला...

वाटते असेच हरवून जावे तुझ्या डोळ्यात, विसरून साऱ्या जगाला !!!
.
Previous Post Next Post